'स्त्री भृण
हत्या'
स्री भृण
हत्या व आपली जबाबदारी
स्री भृण
हत्या हा आपल्या देशाला लागलेला सामाजिक कलंक आहे . त्याचा सामना कसा करायचा हे एक
फार मोठे आव्हान सरकार ,सामाजिक संस्था आणि प्रत्येक सुजान
नागरीकापुढे आहे. भारतात स्री गर्भाच्या हत्येचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाच्या (युएनपीएफ) ताज्या अहवालात नमूद करण्यात आले
आहे.
१९९९ मध्ये
दर एक हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण ८१९ मुली असे झाले आहे. मुली वाचवण्यासाठी
आता मोहीम सुरु करणे गरजेचे आहे. २०१० च्या जनगणनेनुसार अल्वर जिल्ह्यात प्रति एक
हजार मुलांमागे मुलींची संख्या ८८८ होती. हेच प्रमाण राज्य पातळीवर ९०९ तर देश
पातळीवर ९२७ आहे. परंतु महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्री गर्भाच्या हत्येचे
प्रमाण लक्षणीय आहे. सरकारने गर्भ लिंग चाचणीला कायदेशीर बंदी घालूनही मानवतेचे
हत्यारे असलेले अनेक वैद्यकीय व्यावसायिक आडमार्गाने लिंग चाचणीचे धंदे करीत
आहेतच.
स्री
गर्भाच्या हत्येचे प्रमाण रोखण्यासाठी एक क्रांतिकारी उपक्रम राबविला पाहिजे.
त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेऊन आपापल्या पातळीवर प्रयत्न करणे
गरजेचे आहे. कधीही न पाहिलेल्या जगाचा निरोप घेण्याची दुर्दैवी वेळ स्री गर्भावर
येऊ नये असे या प्रकल्पाचे स्वरूप असायला हवे. स्री गर्भाच्या हत्येसंदर्भात
जनसामन्यांमध्ये अगदी प्राथमिक स्तरावर जागृती होणे आवश्यक आहे. त्याचे गांभीर्य
लोकांना कळणे आवश्यक आहे. यासाठी बदल होणे गरजेचे आहे. स्री भृण हत्या रोखणे खरे
तर हा उपक्रम देशात सर्वत्र राबवणे आवश्यक आहे. सर्व समाजाने यासाठी पुढाकार घेऊन
याचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. स्री गर्भाचे रक्षण ही एक राष्ट्रीय
जबाबदारी असून कोणताही धर्म, जात,
पंथ यांची मर्यादा न बाळगता प्रत्येक
भारतीयाने आपापल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्री भृण हत्या रोखावी यासाठी
महिला बचत गट,
सामुदायिक विवाह मंडळे आणि सामाजिक
कार्यकर्ते यांनी क्रांतिकारी विचार प्रसार करणे गरजेचे आहे. जी स्री आपल्याला
जन्म देते,
आपले पालन पोषण करते, शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करते त्या
स्री जातीच्या अस्तित्वावरच स्री भृण हत्येमुळे संकट आले आहे.
स्री भृण
हत्या या गंभीर आजाराने समाजाला पुरते ग्रासलेले आहे. गेल्या वर्षात राज्यात
अंदाजे ४ लाख ६८ हजार ६८० मुलीना गर्भातच मारण्यात आल्याचे टिपाणामध्ये नमूद केले
आहे. स्री हत्येची समस्या दिवसेदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे. स्री पुरुष लिंग गुणोत्तर
अतिशय असंतुलित झाले आहे. ही एक अतिशय गंभीर व चिंताजनक बाब आहे. आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर,
नवनवीन संशोधन यामागे नेहमीच उदात्त हेतू
असतो. सोनोग्राफी या तंत्रज्ञानाबद्दल घडलेले दिसते. शरीरात होणारे अनावश्यक बदल
उग्र स्वरूप धारण करण्याआधी जर टिपता आले, तर त्यावर योग्य उपचार करता यावा किंवा गर्भामध्ये जर काही व्यंग असेल आणि
चाचणीत ओळखून योग्य निर्णय घेता यावा या दृष्टीने सोनोग्राफी एक आशेचा किरण वाटला.
मूळ मानव जातीच्या कल्याणासाठी विकसित तंत्रज्ञानाचा विपरीत परिणाम करण्यासाठी
वापर झाल्यामुळे एका नवीनच समस्येचा उगम झाला आहे..... ती म्हणजे स्री भृण हत्या.
पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असतो. कर्ता-धर्ता असतो. त्यामुळे पुरुषाला कुटुंबात अनन्यसाधारण महत्त्व असते. हीच गोष्ट मुले लहानपनापासून पाहत असतात. म्हणून त्याच गोष्टी त्यांच्या मनामध्ये रुजतात. मुलांना लहानपणापासून विशेष वागणूक मिळते. महागडी खेळणी, पौष्टिक आहार, मैदानी खेळ, मान, सन्मान इ. तर मुलींना बंधनात वाढवले जाते. हे करू नकोस ते करू नकोस. घरकामात लक्ष घाल, मुलीना असच वागायला हवं, सगळीकडे मोजमापे लावली जातात. सतत तू मुलगी आहेस याची जाणीव करून दिली जाते. लग्न झाल्यावर मुलीला सासरी जाव लागत म्हणजेच ती परक्याच धन आहे. अर्थातच तिला किती शिकविले तरी त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही. असा चुकीचा ग्रह निर्माण झाला आहे. मुलीच्या लग्नाच्या वेळी द्यावा लागणारा हुंडा मुलगी किती ही शिकली तरी तिच्या योग्यतेचा वर शोधताना आई वडिलांची होणारी फरफट आणि हुंड्यासाठी करावी लागणारी तडजोड मुलींच्या नजरेतून सुटत नाही. मुलगी जन्मली की तिच लग्न होईपर्यंत याच व्यथेने पालक व्यस्त असतात. म्हणजेच स्री- भृण हत्येच्या पद्धतीला म्हणजेच समस्येला हुंडा पद्धती अप्रत्यक्षपणे हातभारच लावत असते.
आपल्या समाज
व्यवस्थेतच ही संकल्पना ठाम रुजलेली आहे की मुलगा म्हातारपणी आपला सांभाळ करेल, मुलगी काय लग्न झाल की सासरी निघून जाईल
.त्यामुळे जर मुलीकडे राहावे लागले तर पालकांना फार अपराध्यासारख वाटत आणि
समाजातही त्यान मान मिळत नाही. मुलगी जन्मालाच न आलेली बरी असा एकांगी विचार
करण्यास प्रवृत्त करते,
आई वडिलांनी लहानपणापासूनच दोन अपत्यामध्ये
भेदभाव करू नये,
जेणेकरून मुलामध्ये हे विचार रुजणार नाही
याची काळजी घ्यावी.मुलगा किवा मुलगी असो.दोघानाही समान वागणूक मिळायला पाहिजे.
दोघानचीतुलना ही कधीच करू नये.
१) कायद्याची
एक बाजू पहिली तर गर्भ धारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व निदान कायदा १९९४ च्या कलम४
नियम ९ नुसार एक फाँर्म दाखल करणे डॉक्टरांना अनिवार्य आहे.
२) या
कायद्यात २००३ मध्ये सुधारणा करण्यात आली सेक्शन ४ नुसार गर्भवती स्रीच्या
चाचण्याचे पूर्ण रेकॉर्ड ठेवणे डॉक्टरांना बंधनकारक आहे. सेक्शन २३ नुसार
कायद्यातील कोणत्याही तरतुदीचे उल्लघन केल्यास ३ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
सेक्शन १७-१९ नुसार अधिकाऱ्यांना गर्भलिंग निदान चाचण्याची शंका असणाऱ्या ठिकाणी
शोध वॉरंट जारी करण्याचा अधिकार आहे. सेक्शन ३०-१२ नुसार सोनोग्राफी मशीनचा शोध
घेणे,
ताब्यात घेने सिल करणे इ.अधिकार आहेत.
कायदे
अस्तित्वात असूनही हे गुन्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात घडत असतील तर त्यातून पळवाटा
शोधल्या जात असाव्यात किवा व्हायला हवी त्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी होत नसावी
किवा ते डॉक्टरांवर जरब निर्माण करण्यास पुरेसे नसावेत.
आई मला
जगायचंय ही आर्त हक कानावर पडताच आईचा जीव कासावीस झाला अन डोळे पाणावले . पण
करणार काय?
रुढी परंपरेने ग्रासलेल्या देशात तिच्या
सारख्या अनेक कळ्या रोज खुडल्या जातात मग तिला जिवन मिळणे कुठे शक्य होते,”आई” मालाहे सुंदर जग पहायचं बाबा व आजीचा सहवास अनुभवायचा हे ती सतत आईला गर्भात
सांगत असे. ”मुलगा-मुलगी”अस भेद करणे निरर्थक गोष्ट आहे. जेव्हा त्या कोवळ्या जीवाचा पिताच तिचा अंथ
करतो. त्या वेळी हा समाज त्याला विरोध करत नाही ही गोष्ट मानला दुखावते .मुली
सगळ्यावर अधिक प्रेम करतात. आई-वडीलानाही त्याच जीव लावतात. तरीही मुलगी नको, अशी भावना का असते ? अनेकाच्या मनात हाच विचार असतो , विचार बदलण्यासाठी आता युवा रस्त्यावर उतरला
पाहिजे,
स्रीयांना कमकुवत मानले जाते, याचीही या युवा पिढीत चीड आहे पालक इतके
निष्ठुर कसे होतात?
गर्भातच उमलणाऱ्या कळीला ते असे कसे खुडून्
टाकू शकतात?
त्या जीवालाही जगण्याची इच्छा नसेल ? आपण ही उमलावे, फुलावे असे वाटत नसेल?
तो जीव तुमच्याशी बोलू शकत नाही, स्वतःला वाचवू शकत नाही म्हणून पालकाच त्याचा
गैरफायदा घेणार ?
पालक स्वतःला कसे माफ करू शकतात ?
आपण दररोज
सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्र पाहतो. पहिल्या पानावर स्रीयावर अन्याय,अत्याचार,बलात्कारच्या घटना,
छळ करून मारणे , त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणे. अनेक
मार्गाने स्रीयांचा छळच केला जातो असे का होते. या मागची करणे कोणती? स्रीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोणच बदलायला
हवा. स्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून पहिले जाते.हेच बघा ना ताजे उदाहरण राजधानी
सारख्या शहाराच्या ठिकाणी दिल्लीत चालत्या बसमध्ये एका २३ वर्षाच्या युवतीवर
सामुहिक बलात्कार ही केवढी मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आशा अनेक घटना पाहतो, ऐकतो. स्रियांच्या अत्याचाराविषयी सांगावे
तेवढे कमीच आहे. जी मानवजातीची निर्मिती करते तिलाच नष्ट करायला लागलेल्या
राक्षसाला शिक्षा ही व्हायलाच हवी.
एक स्री
किती महत्वाची भूमिका बजावते ती कुणाची तरी मुलगी असते...ती कुणाची तरी बहिण
असते...ती कुणाची तरी पत्नी असते...ती कुणाची तरी आई असते...ती कुणाची तरी माय
असते...ती कुणाची तरी आजी असते; ही सगळी नाती फक्त एक स्रीच जपू शकते. या प्रगत राष्ट्रामध्ये मग तिच्यावर का
असा अन्याय,
अत्याचार असा प्रश्न डोळ्यापुढे उभा राहतो मग
तिच्या या प्रश्नांना कोणी वाचा फोडू शकत नाही का? नुसता कायदा करून उपयोग नाही जितका कायदा कडक तितक्या पळवाटा जास्त. जेव्हा
लोकांच्या सहकार्यातून समंजस पणाने जेवढे प्रश्न मार्गी लागतील त्यातून स्री भृण
हत्येला जीवदानाच मिळेल.
स्रियांच्या
समस्या जाणून घेऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. एका स्रीनेच एका स्रीला
वाचवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आजच्या महिलांनीच लोकांना जागृत करण्याचा
प्रयत्न केला पाहिजे. अशी भूमिका समाजातील सर्व जाती धर्मातील तळागाळातील समाज
जेव्हा घेईल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्री भृण हत्या थांबेल.
मुलगा
वंशाचा दिवा आहे . त्याला मात्र तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे मुलीला मात्र
कमीपणाची वागणूक द्यायची आणि लवकरच तिचे लग्न करून द्यायचे. समाजातील ही
विचारसरणीच बदलायला हवी,
कल्पना करा स्री जर जन्मालाच आली नाही तर एक
दिवस असा येईल की मनुष्य जातच ह्या भूतलावरची नष्ट होईल हे जग ओस पडेल स्रीलाही
पुरुषाच्या बरोबरिने स्थान देऊन तिच्यावरील अन्याय अत्याचार थांबवायलाच हवा
समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय स्रीयांवरील अन्याय अत्याचार कमी होणार नाही.
स्त्रियांविषयी घृणास्पद वागणूक जेव्हा समाजाच्या मनातून निघून जाईल तेव्हाच खऱ्या
अर्थाने स्त्री मुक्तपणे स्वतंत्रपणे जगू शकेल व स्त्री भुण हत्येचे प्रमाण कमी
होईल व मुलीच्या जन्माचे स्वागत केले जाईल तसेच स्त्रीभ्रूण हत्यावर कडक कारवाई
करणे गरजेचे आहे. स्त्रीभ्रूण हत्येला हा समाज जबाबदार आहे. स्त्रीभ्रूण हत्या
सामुहिक पुढाकाराने टाळता येऊ शकते पण आपल्या समाजाला अद्याप तेवढे भान आलेले
नाही. आज सर्वत्र स्त्रियांवरील अत्याचाराचा भस्मासूर बोकाळला आहे. पण याला
जबाबदार कोण?
कधी कधी एक स्त्रीच एक स्त्रीचा गळा घोटते.
स्त्रीच म्हणते मुलगी नको मुलगा हवाय तसेच अनेक ठिकाणी शहरामध्ये स्त्रियांवर
होणारे अन्याय अत्याचार यालाही काही अंशी स्त्रियाच जबाबदार आहे. स्त्रियांचे
राहणीमान अत्यंत तोकडे कपडे वापरणे पाश्चात्य राहणी मानाचे अनुकरण करणे तसेच
ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनीही स्त्रियांवरील अन्यायाला वाचा
फोडण्यासाठी स्त्री-शिक्षणाची चळवळ सुरु केली. त्यांनीही स्त्रियांवरील अन्याय दूर
करण्याचा प्रयत्न केला स्त्रीला कमी लेखण्याची परंपरा प्राचीन काळापासूनच होती.
सती जाण्याची पद्धत ही पद्धत राजाराम मोहन रॉय यांनी मोडून काढली व तसा कायदा
आमलात आणला आजही संरक्षणासाठी अशा कायद्याची गरज आहे.
विवाहाच्या
कायद्यात बदल झाला असला तरी ही आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये कमी वयाच्या
मुलींची लग्न केली जातात आणि मग कमी वयात तिच्यावर संसाराचा बोजा पडतो. हा घटक
स्त्रीभ्रूण हत्येला कारणीभूत आहे. स्त्रीभ्रूण हत्या हा समाजाला लागलेला कलंक दूर
करण्यासाठी खऱ्या अर्थाने सामाज प्रबोधनाची गरज आहे. विनाशाच्या खाईकडे चाललेला
समाज भरकटलेले स्त्रीभ्रूण हत्येचे बीज याला आज वाचविण्याची गरज आहे. एक स्त्री
वाचली तर एक कुटुंब वाचेल,
एक घर वाचले तर एक वस्ती वाचेल, एक वस्ती वाचली तर एक खेडे वाचेल,ऐक खेडे वाचले तर एक तालुका वाचेल,ऐक तालुका वाचला तर एक जिल्हा वाचेल, एक जिल्हा वाचला तर एक राज्य वाचेल, एक राज्य वाचले तर एक देश वाचेल, एक देश वाचला तर संपूर्ण जग वाचेल, म्हणूनच मला असे वाटते स्त्रीभ्रूण हत्या
थांबलीच पाहिजे.
